Saturday, December 28, 2013

बागलाणचे आराध्य दैवत देवमामलेदार यशवंत महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली !!

बागलाणचे आराध्य दैवत देवमामलेदार यशवंत महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली !! 
यात्रोत्सवानिमित्त सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा !!!


Sunday, December 22, 2013

पक्षासाठी नाही तर देशासाठी मतदान करा - नरेंद्र मोदी

या सभेत मोदींनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. सभेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह, माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, लोकसभा उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी भाषण केले.
नरेंद्र मोदींच्या भाषणातील काही ठळक मुद्दे :-
  • पक्षासाठी नाही तर देशासाठी मतदान करा
  • वोट बँक चे राजकारण करणारी काँग्रेसला हद्दपार करा
  • केंद्र सरकार घोटाळ्यांची सरकार आहे
  • काँग्रेस मुक्त भारत करा
  • एकीकडे आम्ही लोह गोळा करून सरदार वल्लभभाई यांचा पुतळा उभारतो आहे तर दुसरीकडे ही महाराष्ट्र सरकार विक्रांत ची बोली लावत आहे
  • देशात सरकार त्यांचे असूनही महाराष्ट्राला २४ तास वीज पुरवठा का होत नाही ?
  • जलसिंचन प्रकल्प ताटकळत का पडले आहेत ?
  • विविध योजना ह्या केवळ नावापुरताच राहिल्या आहेत
  • मुंबईत बॉलीवूड असूनही त्यांच्यासाठी आणि देशातील इतर चित्रपटकर्मींसाठी तसेच ह्या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यासाठी सिनेमाची १०० पुर्तीनिमित्त साधे फिल्म विद्यापीठ ह्यांनी केले नाही
  • एकाच दिवशी स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळूनही महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या विकासात तफावत आहे
  • महाराष्ट्र गुजरातचा मोठा भावासारखा आहे
  • मुंबई तर गुजराथी भाषेचे माहेरघर आहे
  • देशातील प्रत्येक बेरोजगाराला रोजगार मिळालाच पाहिजे
  • युवकांच्या कौशल्यावर भर दिला गेला पाहिजे
  • केंद्राने नर्मदा सरोवर चे दरवाजे बसविण्याची परवानगी दिली तर महाराष्ट्राला ४०० करोड ची वीज मोफत मिळेन
  • केवळ स्वःताच्या फायदाचे पाहणारे काँग्रेस सरकार आहे
  • अल्पसंख्यांकांचे नाव वापरून केवळ योजना बनविल्यात, अंमलबजावणी किंवा खर्च मात्र शून्यच
  • एलबीटी हा लोकल बॉडी कर नसून तो “ लूट बाटनेकी टेकनिक ” आहे
  • शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळ, पाणीटंचाई, लोडशेडीग यांकडे लक्ष वेधले
  • ही “महागर्जना” पूर्णपणे “मोदीमय” झाल्याची चित्र होते.

Saturday, December 21, 2013

आपला साथीदार - आपले विचार

लवकरच आपल्यासमोर आम्ही घेऊन येत आहोत, साथीदार एक नवीन स्वरूपात. गेल्या २३ वर्षांची वाचक परंपरा वृद्धिंगत करण्यासाठी आणि आपले विचार जाणण्यासाठी हा एक प्रयत्न.



- व्यवस्थापक, साप्ताहिक साथीदार

Tuesday, November 26, 2013

भावपूर्ण श्रद्धांजली

देशदूत चे सल्लागार संपादक व जेष्ठ पत्रकार सुरेशजी नारायण अवधूत यांना विनम्र श्रद्धांजली

२६ नोव्हेंबर च्या हल्ल्यातील शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली

तसेच गृहरक्षक दलाचे माजी जिल्हा समादेशक सुधाकर भालेकर यांना विनम्र श्रद्धांजली
-     
             श्रद्धान्वत - साप्ताहिक साथीदार परिवार, नाशिक

Monday, November 18, 2013

विनम्र अभिवादन : साथीदार अंक

साहेबांना विनम्र अभिवादन



 श्र्द्धानवत :- स्व. द्वारकादासजी पालीवाल बहुद्देशीय फाउंडेशन, जळगाव

साहेबांना विनम्र अभिवादन - साथीदार परिवार

साहेबांना विनम्र अभिवादन

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची पहिली पुण्यतिथी त्याबद्दल त्यांच्या स्मृतीस विनम्र वंदन.
साथीदार परिवाराकडून साहेबांना ही शब्दांजली !!



Tuesday, November 5, 2013

मग, यंदा साजरी कराल प्रदूषण मुक्त दिवाळी

आपला कोणताही उत्सव तोंडावर आला  की चर्चा सुरू होते ती प्रदूषणाचीच. गणेशोत्सव आला, की नदीच्या प्रदूषणाची आणि दिवाळी आली की हवेच्या प्रदूषणाची. भारतीय संस्कृती निसर्गाच्या अधिकजवळ जाणारी संस्कृती आहे. भारतीय सण म्हणजे निसर्गाची पुजा, मात्र असे असताना अलिकडच्या काळात सणांनीही प्रदूषण वाढविण्यात मोठा हातभार लावला असल्याचे नाकारता येत नाही.

    "दिन दिन दिवाळी...गायी-म्हशी ओवाळी...',"इडा- पिडा टळो; बळीचे राज्य येवो...' अशी गाणी आणि आसमंत उजळून टाकण्यासाठी हातात दिवट्या घेऊन निघालेली बच्चे कंपनी. आजही ग्रामीण भागात दिसतात, सर्वांना हवेहवेसे वाटणारे हे रूप. दिव्यांचा, आनंदाचा, स्नेह-प्रेम वृद्धिंगत करणारा हा सण आजही ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने हर्षोल्हासात साजरा केला जातो. त्यामुळे ग्रामीण भागात प्रदूषणाचे प्रमाण कमी आहे. त्या तुलनेत शहरी भागात डोकावून बघितले तर प्रदूषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होताना दिसते. कारण तेथे वाढते शहरीकरण, वाढणारी लोकसंख्या आणि त्यातून सणवारच्या काळात होणारे प्रदूषण मोठ्या प्रमाणत आहे. निसर्गाची पूजा ग्रामीण त्याच पद्धतीने होताना दिसते मात्र शहरी भागात त्याला वेगळेच रूप पहावयास मिळते.  

   ग्रामीण भागाप्रमाणे पारंपरिक पद्धतीने दिवाळी मोठ्या उत्साहाने साजरी करावी. दिवाळी साजरी करताना सामाजिक जाणीवांचे भान आपण एक जबाबदार नागरिक म्हणून नेहमीच ठेवायला हवे. फटाक्यांची आतषबाजी करताना ध्वनीची तीव्रता किती प्रमाणात वाढते याचा कधी आपण विचारच करत नाही. ध्वनी व वायू प्रदूषण यामुळे पर्यावरणाचा तोल बिघडतो व फार मोठ्या संकटास आपण आमंत्रण देतो. फटाके पेटवल्याने प्रदूषणातही भरच पडते. वायू प्रदुषणापेक्षा दिवाळीत ध्वनी प्रदूषण जास्त दिसतं. फटाके जाळल्यानंतर १२५ डेसिबल पेक्षाही मोठ्या प्रमाणात आवाज येणा-या फटाक्यांवर कायद्यानं बंदी घातली गेलीय. तरीही काही माणसं मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण करणा-या फटाकांचा वापर टाळण्याचं नाव काही घेताना दिसत नाहीत. जास्त ध्वनी प्रदूषण झाल्याने कमी ऐकू येणं, उच्च रक्तदाब, हार्टअटॅक तसेच झोपे संबंधींच्या व्याधी सतावतात. अचानक वाढलेल्या ध्वनी प्रदुषणाच्या संर्पकात आल्याने तात्पुरता किंवा नेहमीसाठी बहिरेपणा होण्याची शक्यता आहे. हे सर्व टाळण्यासाठी यंदा प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करावी लागणार आहे. असे दरवर्षी म्हणण्याची वेळ येऊ नये याकडे आपण सर्वांनीच लक्ष देण्याची गरज आहे.

    सर्व प्राणीमात्रांसाठी, व्यक्तींसाठी तसेच पर्यावरणासाठी येणारा दिवाळीचा सण सुरक्षित आणि अनुकून पध्दतीनं साजरा करण्याची प्रतिज्ञा आपण सर्वांनी केली पाहिजे. दिवाळी म्हणजे नक्की काय तर मातीपासून बनवलेल्या सुंदर पणत्यांमध्ये तेलाचा दिवा उजळवून अज्ञानारूपी अंधकारचा शेवट करायचा असतो. असं केल्याने जुन्या वाईट गोष्टी नष्ट होऊन, नव्या प्रकाशाचा, नवनवीन उत्साही गोष्टींचा जन्म होतो. पण काही व्यक्ती दिव्य प्रकाशांचा हा सण साजरा करण्यासाठी असुरक्षित मार्गांचा अवलंब करताना दिसतात.मात्र यंदा प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करून पुढच्या पिढीला चांगले पर्यावरण देण्याचा प्रयंत्न करण्याची आवश्यकता आहे.
विकास भुजबळ, लासलगाव

हतबल



यांच्या नशिबी दुष्काळच
ओला काय ? अन सुका काय ?
हतबलता ना काही दिलासा नाय...!

तहानलेल्या आईची चिंता
खळगी भरणाऱ्या बापाची चिंता
भेगाळलेला भूईला कस भिजवू ?
फुटलेल्या डोळ्यात पाणीच नाय...!

आश्वासनांची खैरातीला....
मुडद्याची रांग....!!
सावकारी कर्जांची दमझाक
आत्महत्या बाकी गाठोडे...!!
घरदारावर मात्र सार्यांचे पाय...!!

हेच रहाटगाड ग सारीकडे
नांगरलेले आयुष्य सारीकडे
निसर्गच कोपला....!!
तेहतीस कोटी देवांचे काय ??

हतबलता
बारमाही काहीशी अंधुक आशा फक्त ...!!
                       
                             - देविदास खडताळे, नाशिक

माझ्याच पासुन दूर मी ही


आज ही माझ्याच पासुन दूर मी ही
तू जशी आहे तसा मजबूर मी ही

भेटण्या जितकी मला उत्सुक असते
ये व्यथे ये तेवढा आतूर मी ही

जेवढे जातो जवळ ती लांब जाते
वाटते आता रहावे दूर मी ही

लागला होता तिला माझा लळा पण,
प्रेम ही केले तसे भरपूर मी ही

येवढे शिकलो यशश्वी डाव त्यांचे,
जाहलो बघ खेळतांना क्रूर मी ही

सांगणारे सांगता लाखो कहाण्या
नीट आता वाचतो मचकूर मी ही

                  -    दर्शन शहा (स्नेहदर्शन)